सिल्लोड तालुक्यातील तळणी गावात केंद्रिय आयुष मंत्रायला अंतर्गत मोफत २५०० औषधी वनस्पती रोपटे वाटप .सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे
भराडी, तळणी येथे केंद्रीय आयुष मंत्रालय व सावित्रीबाई फुले विद्यापीठ ,पुणे याच्या वतीने तथा अग्निपंख फार्मर प्रोडूसर कंपनी सिल्लोड व गणराज फोटो व्हिडिओ तळणी यांच्या संयुक्त विद्यामानाने २५०० औषधी रोपटे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.के.एन .धुमाळ,( Deputy Director RCFC –WR Botny DEFT)प्रा.डॉ. भागवत वाघ (अग्निपंख फार्मर प्रोडूसर कंपनी सिल्लोड ) डॉ.व्ही.पि.ढगे.इत्यादींची उपस्थिती होती तर अध्यक्ष म्हणून पं.स.सिल्लोड चे माजी सभापती अशोक दादा गरुड याची उपस्थिती होती. डॉ.भागवत वाघ यांनी कार्यक्रमची प्रस्तावना/रूपरेषा सांगताना औषधी वनस्पती कशा प्रकारे आपल्याला उपयोगी असतात त्याचे महत्व पटवून देत" खेड्याकडे चला" हा महात्मा गाधीनी दिलेला संदेश सांगत आयुर्वेदाचे महत्व स्पष्ट केले. तर डॉ. धुमाळ यांनी औषधी वनस्पती कोणती लागवड करावी,कोणत्या औषधी वनस्पतीचा बाजार भाव कसा असतो.याची सविस्तर माहिती देत कोरोणा काळात अत्यंत उपयोग ठरलेल्या गूळवेल व सुकलेले काय भावाने विक्री केल्या जाते याचीहि माहिती दिली. आझादी का ७५ वा अमृत महोत्सव आपण साजरा करत असून या अमृत उत्सहात आपण केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने भारत भर वनस्पती औषधी विषयी जनजागृती करून त्यास योग्य पद्धतीने लागवड करून आपण पारंपारिक शेती पेक्षा जास्तीचा नफा मिळवू शकतो याची जाणीव प्रत्येक शेतकऱ्याला करून देणार असल्यचेही सांगतिले तथा भाव नसलेल्या तत्काळ पिकला प्रोसेसिंग करून उच्च भाव मिळवतो येतो त्यासाठी शासनाच्या अनेक योजना देखील आहे याची माहिती तुम्ही इंटरनेवर शोधून बघा.विदर्भातील एका १२ वि पास असलेल्या तरुणाने आपल्या गावातील नागरिकांना गूळ वेल या औषधी वनस्पतीची लागवड ते काढणी करून रोजगार देत स्वता कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळवल्या आहे असे सांगत त्यांनी तरुणांनी शेती व्यवसाया कडे एच संदेश देखील दिला. तळणी गावातील दगडू ठोंबरे हे औषधी वनस्पती प्रेमी प्रगतशील शेतकरी असून त्यांनी हा केंद्रीय कार्यक्रम आपल्या गावात होण्यासाठी वेळोवेळी आमच्या सोबत संवाद साधत राहिले व आपल्या गावात या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल कौतुक केले .तर पं.स.सिल्लोड माजी सभापती अशोक दादा गरुड यांनी भारतात इंग्रज येण्या अगोदर सर्व पक्का माल तयार होत असे परंतु इंग्रज आल्या नंतर त्यांनी आपला कच्चा मला निर्यात सुरु केली व भारतात पक्का माल तयार करण्यास अडथळे आणले त्यामुळे आपल्या कडील कच्च्या मालाचे पक्का माल होण्याच्या प्रकिया मंदावल्या परंतु आता शासनाने आपल्याला लगत असलेल्या औषधी वनस्पतीचे गरज लक्षात घेत.अनेक योजना सुरु केल्या आहे .त्याच लाभ घेवून आपण सर्वांनी औषधी वनस्पती लागवड करावी असे आव्हान शेतकऱ्यांना करत आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. सरपंच प्रभाकर ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल. तर यावेळी कैलास गरुड ,गणेश ठोंबरे,प्रभाकर ठोंबरे,संतोष वाघ,ज्ञानेशवर ठोंबरे,अमोल ठोंबरे,मदन ठाकूर,आदिन सह गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.