शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या

शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या


(धाड प्रतिनिधी अबुजर मिर्जा)

बुलडाणा जिल्ह्यातील धाड पोलिस ठाणे हद्दीत आणखी एक शेतकरी आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. वरुड येथील सुभास उर्फ सखाराम उत्तम मघाडे (वय 35) या शेतकऱ्याने दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 ते 8 वाजताच्या दरम्यान आपल्या पांगरखेड शिवारातील गट क्र. 89 मधील शेतात आडजाड झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

प्राथमिक माहितीनुसार, मृतक शेतकऱ्याच्या नावावर शेती असून त्याने पिक कर्ज घेतले होते. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

या घटनेची माहिती दिलीप किसन मघाडे (वय 50, रा. वरुड) यांनी पोलिसांना दिली. घटनेची नोंद धाड पोलीस स्टेशनमध्ये मर्ग क्र. 37/25 कलम 194 भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत करण्यात आली आहे. दाखल अधिकारी पो.ना. ईश्वर हावरे (ब.नं. 2104) यांनी नोंद केली असून तपासाची जबाबदारी पो.ना. श्रीकृष्ण चव्हाण (ब.नं. 2042) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन व सरकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Post a Comment

أحدث أقدم

sx

1