विजेचा कहर: ४ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची प्रत्येकी १ कोटी नुकसानभरपाईची मागणी

सिल्लोड तालुक्यात विजेचा कहर: ४ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची प्रत्येकी १ कोटी नुकसानभरपाईची मागणी




सिल्लोड, १४ जून २०२५ सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळले आहे. शेतामध्ये काम करत असताना विज पडून चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेले शेतकरी पुढीलप्रमाणे:

  • जनाबाई बापुराव शिंदे (वय – ४५), रा. मोढा बु.
  • रोहित राजू काकडे (वय – २२), रा. सारोळा
  • यश राजू काकडे (वय – १६), रा. सारोळा
  • शिवाजी गव्हाणे (वय – २८), रा. पिंपळदरी

हे सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहासाठी शेतामध्ये कष्ट करत असताना अचानक वादळी पावसात विजेचा मोठा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १४ जून रोजी सिल्लोड तालुक्यात घडली आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष सिल्लोड तालुका यांच्या वतीने शासनाकडे जोरदार मागणी करण्यात आली आहे की, प्रत्येक मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई तातडीने जाहीर करावी.

सरकारचा निष्क्रियपणा?

शेतकऱ्यांवर एकीकडे निसर्गाचे संकट तर दुसरीकडे सरकारचा निष्क्रियपणाही दिसून येत आहे. विमान अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भरघोस नुकसानभरपाई मिळते, मग जिवाची बाजी लावणाऱ्या शेतकऱ्यांना का नाही?

"गरिबांचा जीव सरकारच्या दप्तरी शून्य किमतीचा का?" असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्पष्टपणे सांगितले आहे की, शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि जर शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.


संपर्क:
जी एस नाईन मराठी वृत्त वाहिनी मुख्य संपादक 
[९७३०३००९१९]

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

sx

1